Pavitra Portal Change the process for ninth to twelve class

Pavitra Portal Change the process for ninth to twelve class

‘पवित्र’वर नववी ते बारावीसाठी दुरुस्ती प्रक्रिया

Teachers Recruitment Process : Recruitment process has been made available to the students who have been thrown out of the priority process on the Pavitra Portal, having received less than 50% marks in the postgraduate and postgraduate education programs. Candidates from Class IX to XII can be repaired for their postgraduate degree.

शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम भरताना पदवी, पदव्युत्तर शिक्षणात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रमाच्या प्रक्रियेतून दूर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्तीची प्रक्रिया पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नववी ते बारावी गटातील उमेदवारांना आपल्या पदव्युत्तर पदवी विषयाची दुरुस्ती करता येईल.

शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे केली जात आहे. त्यात खासगी शाळातील इयत्ता नववी ते बारावी गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आलेले नाहीत. यापेक्षा अधिक गुण पदवी, पदव्युत्तरला असतील तर प्राधान्यक्रम भरता येणार अशी अट होती. त्यावरून ५०पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर शिक्षण विभागाने दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण विभागाने म्हटले आहे की, खासगी शाळातील नववी ते दहावी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यातील उत्तीर्ण श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. नववी ते दहावी या गटातील उमेदवारांकडून त्यांच्या पदवी स्तरावरील श्रेणीची माहिती घेण्यात येणार नाही. अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येतील. त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे. खासगी शाळातील इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. ते पदव्युत्तर पदवीच्या विषयातील किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असल्यास विचारलेल्या माहिती समोर ‘एस’ म्हणावे. योग्य माहिती नमूद करून सेव्ह करावी आणि सेव्ह केलेली माहिती आपल्या प्रोफाइलमध्ये योग्य आहे की नाही तपासून पहावी. यासह उमेदवारांच्या श्रेणीची माहिती केवळ पदव्युत्तर पदवीमध्ये पूर्वीच्या निकषांपेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेद्वारांकडूनच मागविण्यात येत आहे.

सौर्स : मटा

Govt Recruitment Exam pattern will be change

Govt Recruitment Exam pattern will be change

राज्यातील पदभरतीच्या परीक्षा पद्धतीत बदल होतील

There will be no injustice to the students in the state. We all have feelings for student well-being. Taking into account the feelings of the candidates regarding the Mahapariksha portal, necessary changes will be made in this examination system. Read the all important details regarding this news are given below. Candidates keep visit us for further updates.

‘राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा एकही निर्णय महापरीक्षा पोर्टलसारखी परीक्षा पद्धत किंवा आमचे सरकार घेणार नाही. विद्यार्थीहितासाठी आपल्या सर्वांच्या भावना एक आहेत. पोर्टलच्यासंदर्भात परीक्षार्थीच्या भावना लक्षात घेऊन, या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत जाहीर केले.

राज्यातील पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमधील गैरप्रकारांबाबत आमदार सतेज पाटील, सतीश चव्हाण, किरण पावसकर, हेमंत टकले यांनी लक्षवेधी विचारली होती. यावर ठाकरे यांनी माहिती दिली. राज्यात महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांमधील विविध गैरप्रकारांवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तांद्वारे प्रकाश टाकत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे मांडले. ठाकरे म्हणाले की, महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांच्या संतप्त भावनांची मला जाण आहे. त्यामुळे पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. या पोर्टलबाबत लोकप्रतिनिधींना माहिती द्यायची असल्यास, त्यांनी माझ्या दालनात येऊन माहिती द्यावी. राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा एकही निर्णय महापरीक्षा पोर्टल; तसेच सरकार घेणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले की, ‘महाआयटी’च्या माध्यमातून महापरीक्षा पोर्टलद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते. यासाठी विषयतज्ज्ञ प्रश्नपत्रिका तयार करत असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील वेगवेगळ्या ६७ परीक्षा केंद्रावर घेतली जाते. या प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारींवरून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून, आणखी एकदा चौकशी सुरू आहे. महापरीक्षा पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. या परीक्षणाच्या अहवालाच्या आधारे महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील. परीक्षार्थींवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आम्हालाही म्हणणे मांडू द्या

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. या गैरप्रकारांची माहिती परीक्षार्थ्यांकडे पुराव्यानिशी आहेत. त्याची एक कॉपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला दिली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेली भरती प्रक्रिया सदोष झाली असून, मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याची माहिती स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारची लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जीतू तोरडमल, शरद गरकल यांनी केली आहे. पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यासाठी उमेदवारांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन एमपीएससी स्टुडन्ट राइट्सच्या महेश बडे, किरण निंभोरे यांनी केले आहे.

म टा…

Online Exam Preparation at School

Online Exam Preparation at School

शाळेत तयारी ऑनलाईन परीक्षांची

Now a day Admission tests of various courses and competitive exams are conducted online. Examination was conducted online at various schools of HRD in order to understand how the students are doing these exams at school age, how to solve their questions, and the nature of online exams. Three thousand students took the exam. All the vocational courses including engineering, pharmacy are being taken online through the entrance exam. Also, many exams and recruitment process are being done online by the government. Against this backdrop, this program has been implemented by the institute for the last seven years so that the school students can know about the nature of online exams. This year, 3,000 children of the institute took lessons from online exams.

Preparation of Online Examination

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येतात. विद्यार्थ्यांना शालेय वयातच या परीक्षा कशा असतात, त्यातील प्रश्न कसे सोडवावे, तसेच ऑनलाइन परीक्षा कशा स्वरुपाच्या असतात, हे समजावे यासाठी मानवधन शैक्षणिक संस्थेच्या विविध शाळांमध्ये ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या. तीन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

इंजिनीअरिंग, फार्मसी यांसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेतल्या जात आहे. तसेच सरकारतर्फे अनेक परीक्षा, भरती प्रक्रियाही ऑनलाइन स्वरुपातच होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांचे स्वरुप माहिती व्हावे, या परीक्षा पद्धतीबाबत माहिती व्हावी या उद्देशाने संस्थेतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा संस्थेच्या तीन हजार मुलांनी ऑनलाइन परीक्षेचे धडे गिरवले.

संस्थेच्या धनलक्ष्मी बालविद्यामंदिर, प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, ब्राईट स्कूल या शाळांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये संगणक लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. उच्च शिक्षणासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे संस्थेचे प्रमुख प्रकाश कोल्हे यांनी सांगितले.

म. टा.

‘This’ company will recruit 23000 employees

‘This’ company will recruit 23000 employees

खूशखबर ! ‘ही’ कंपनी करणार २३,००० कर्मचाऱ्यांची भरती

Maha Bharti 2020 : Ernst & Young (EY), one of the world’s largest professional services companies, will soon be hiring 23,000 employees. Ernst & Young will be recruiting staff for company centers around the world (Global Delivery Services) and member companies. The recruitment will be mainly for those working in the technology sector. EY has already recruited 11,000 professionals for the current financial year. The company plans to recruit another 12,000 professionals by June 30 next year. Information about this has been found on an English website.

नवी दिल्ली : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) ही जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल सर्व्हिसेसपैकी कंपनी लवकरच 23,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. जगभरातील कंपनीच्या केंद्रांसाठी (ग्लोबल डिलिव्हरी सर्व्हिसेस) आणि सदस्य कंपन्यांसाठी अर्न्स्ट अँड यंग ही कर्मचारी भरती करणार आहे.
ही भरती मुख्यत: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असणार आहे. ईवायने याआधीच चालू आर्थिक वर्षासाठी 11,000 प्रोफेशनलची भरती केली आहे. पुढील वर्षी 30 जूनपर्यत आणखी 12,000 प्रोफेशनलची भरती करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे.
ईवायचे मुख्यालय लंडन येथे आहे. जुलै ते जून असे ईवायचे आर्थिक वर्ष असते. सर्वच क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दर घटलेला असताना ईवायने मात्र कर्मचारी भरतीत वाढ केली आहे. कंपनीचे भारतात 50,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आमच्या जगभरातील व्यवसायाला सेवा पुरवण्यासाठी भारत हे आम्हाला महत्त्वाचे ठिकाण वाटते.
तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि हुशार मनुष्यबळ या सर्वच आघाड्यांवर भारत हे योग्य ठिकाण आहे, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. ईवायकडून भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यत: विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयाशी संबंधित प्रोफशनलचा समावेश आहे.

Principal Vacancies

Principal Vacancies

मुख्याध्यापकांची पदे रिक्त

Head Teachers or Head Master Vacancies are vacant. As per news published in the Maharashtra Times there are various Post still not filled in Primary School. Due to the dilapidated stewardship of the education department officials, 17 out of the 15 posts of the headmaster approved for the secondary department are still vacant. On the other hand, there are nine assistant teachers who have been in charge of the headquarters at the municipal school. They have been waiting for the promotion of the post of principal for nine years. Read the complete details given below :

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७ पैकी १५ पदे आजतागायत रिक्त आहेत. तर दुसरीकडे महापालिका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणारे तब्बल १५ सहाय्यक शिक्षक नऊ वर्षांपासून मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. पदोन्नतीकरिता वारंवार मागणी करूनही विभागामार्फत कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी आता आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी केली आहे.

विशेष म्हणजे प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणाऱ्या सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदाचा कोणताही आर्थिक व अन्य सेवाविषयक लाभ मिळत नाही. त्यामुळे या शिक्षकांचे आतापर्यंत किमान १० ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करून माध्यमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापक संवर्गात पदोन्नती देण्याची मागणी प्रभारी मुख्याध्यापकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, सहाय्यक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची गेल्या चार वर्षांत एकही बैठक झाली नसल्याने महापालिकेच्या १५ माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या मुख्यध्यापकपदाची कामे सहाय्यक शिक्षक हे प्रभारी म्हणून सांभाळत आहेत. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या १७ माध्यमिक शाळांपैकी १५ माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकपद हे सन २०१०पासून रिक्त आहेत. सन २००६ ते २०१२ या दरम्यान पार पडलेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत माध्यमिक विभागाकरिता एकूण १७ मुख्याध्यापकपदांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागानेदेखील नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाला शिक्षक-शिक्षकेतर संचमान्यतेमध्ये शाळानिहाय १७ मुख्याध्यापकांच्या पदांना मंजुरी दिली.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सन २०१६मध्ये पदोन्नती समिती स्थापन करण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार शिक्षण विभागाने सन २०१६मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने सन २०११-१२ या सेवाभरती वर्षापासून पदोन्नती प्रस्ताव व निवड सूची तयार केली आहे, परंतु २०१६पासून आतापर्यंत विभागीय पदोन्नती समितीची एकही बैठक न झाल्यामुळे मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची कार्यवाही करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सहाय्यक शिक्षकांच्या पदोन्नतीवर गदा येत असल्याचा आरोप प्रभारी मुख्याध्यापकांनी केला आहे.

२०१०पासून प्राथमिक शिक्षकांना दोन वेळा पदोन्नती

सन २००४ व सन २०१६च्या सरकार निर्णयानुसार प्रत्येक सेवाभरती वर्षात रिक्त असलेली पदे भरती करण्यासाठी पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी, असे बंधनकारक असतानाही पदोन्नती दिली गेली नाही, मात्र सन २०१०पासून प्राथमिक शिक्षकांना आजतागायत दोन वेळा पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षकांनी लवकरात लवकर पदोन्नती मिळावी, म्हणून महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहे.

म. टा.