Maharashtra TET 2021

Maharashtra TET 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (MAha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत  परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (Maha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत  परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ही परीक्षा रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षचे दोन पेपर

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

अर्ज कुठे करायचा?

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करू शकता.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

परीक्षा शुल्क

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु. जाती, अनु. जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.


 The Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) will be held from September 15 to December 31. There are about 27,000 vacancies in Zilla Parishad primary schools and about 13,000 in secondary schools. The education department will fill the vacancies in phases. In the first phase, 6100 seats will be filled.

40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

टीईटी परीक्षा दोन गटात

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 4 थी आणि 5 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

राज्यात शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.


Maha TET 2019: Maharashtra State Exam Council is going to conduct Maharashtra Teachers Eligibility Test 2019. Applications are inviting from eligible applicants for Maha TET 2019 Paper I & Paper II. Interested applicants to this examinations may need to apply online. Also for online applications applicants are need to pay the applications fees as given. Online applications start from 8th November 2019 & closing date for online applications is 28th November 2019. For more details of Maha TET 2019 are as follow:

Maharashtra TET 2019

Eligibility Criteria For Maha TET 2019 Online Form :

  • For Std 1 to 5th (For Paper I) – 12th Pass with D.Ed
  • For Std 6th to 8th (For Paper II) – 12th Pass with B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed

Application Fees For Maha TET Online Form :

Category For Only Paper I or Only Paper II For Paper I and Paper II both
Open, OBC, SBC and VJNT Rs.500/- Rs.800/-
SC, ST and PWD Rs.250/- Rs.400/

Following are the steps for registering and filling the Maharashtra Teacher Eligibility Examination as mentioned below.

  1. Online registration.
  2. Portal Login
  3. Filling the Application Form
  4. Verify the information in the application
  5. Paying Online Exam Fees
  6. Print the application form.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०१९ चे वेळापत्रक

Sr. No Time Table Format Date and Time
1 Period of Online Application and Fee Payment 08/11/2019 to 28/11/2019
2 Removal of admit card print online 04/01/2020 to 19/01/2020
3 Teacher Eligibility Examination Paper – I Date and Time 19/01/2020 from 10:30 AM to 01:00 PM
4 Teacher Eligibility Examination Paper – II Date and Time 19/01/2020 from 2:00 PM to 4:30 PM

Important Link of Maha TET Exam 2019

📝 ऑनलाईन अर्ज
📡 वेबसाईट लिंक
📄 जाहिरात

FYJT CET Exam 2021

FYJT CET Exam 2021

Maharashtra FYJC CET 2021 for for 11th admissions would be conducted on August 21, 2021. Students who wish to appear for the entrance examination would be required to fill the online application form. The Maharashtra FYJC CET 2021 Application Form has been released on cet.mh-ssc.ac.in website link as shared on mahahsscboard.in at 11:30 am today – July 20, 2021.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते त्या ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात ही परीक्षा २१ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० जुलै सकाळी ११.३० वाजल्यापासून ते २६ जुलै पर्यंत अर्ज भरता येणार आहे. हा अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरायचा आहे.

Maharashtra FYJC CET 2021: Important Dates, Direct link to Application Form

Name of the Event Date
FYJC CET Forms releasing July 20, 2021
FYJC CET 2021 exam August 21, 2021
Maharashtra FYJC CET Form Link cet.mh-ssc.ac.in

Police Patil Bharti 2021

Police Patil Bharti 2021

पोलिस पाटलांची १२ हजार ४२२ पदे रिक्त

Police Patil Bharti 2021 – Maharashtra Police Patil Bharti Process Updates will be started soon. As per the latest Update there were Appr. 12,422 Posts are vacant for Police Patil. This Recruitment will be held on Thane & Konkan, West Maharashtra, North Maharashtra and Marathwada Division. Read the more details given below on this page.

  • Thane & Konkan – 1140 Posts
  • West Maharashtra – 1890 Posts
  • North Maharashtra – 1842 Posts
  • Marathwada – 4050 Post

१२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त

  • राज्यात तब्बल १२ हजार ४२२ पोलिस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलिस पाटलांवर तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पाटीलच नव्हे, तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
  • महसूल आणि पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलिस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलिस पाटील करीत असतात.
  • मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही.
  • राज्यात एकूण ३८ हजार ७१२ पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी २६ हजार २९० पदे भरली; तर १२ हजार ४२२ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलिस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलिस पाटलांची सर्वाधिक पदे ही मराठवाड्यात रिक्त आहेत.
  • कोरोना संक्रमणामुळे पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची शक्यता कमीच आहे. मध्यंतरी राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्याने नव्याने बिंदूनामावली तयार करण्यात आली होती. मात्र, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने आता नव्याने बिंदूनामावली तयार करावी लागणार आहे.
  • मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळेही पोलिस पाटील भरतीला विलंब होत आहे. ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलिस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलिस पाटलांची बोळवण करीत आहे.

Department wise Vacancy Details – विभागनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे –

  • ठाणे आणि कोकण विभाग – ११४०
  • पश्चिम महाराष्ट्र – १८९०
  • उत्तर महाराष्ट्र – १८४२
  • मराठवाडा – ४०५०

राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी !

Police Patil Bharti 2020 : There are 27,120 Police Patils operating across the state and they have to pay Rs. 6500/-. While the Kotwalas have been struggling for increased honorarium with the police, they now have to scrap the office of the Superintendent of Police for regular honors.

After the Mahatma Gandhi Tantamukti Abhiyan (Campaign), the Police Patil, who are responsible for the peace and order of the village, are waiting for the honor. The then government decided to increase the honorarium. Accordingly, he received twice the honorarium, but since August he has not received any honorarium. So they have to find employment only for their own family living. Against this backdrop, the Home Planning Department has said that they will now get regular salaries from March.

महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान सैल झाल्यानंतर गावातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणारे गावचे पोलिस पाटीलच मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. तत्कालीन सरकारने मानधनवाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार दोनवेळा वाढीव मानधन मिळाले, मात्र ऑगस्टपासून त्यांना मानधनाचा दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच त्यांना रोजगार शोधावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून आता त्यांना नियिमत वेतन मिळेल, असे ठोस नियोजन गृह विभागाने केले आहे.

राज्यभरात 27 हजार 120 पोलिस पाटील कार्यरत असून त्यांना दरमहा प्रत्येकी सहा हजार 500 रुपयांप्रमाणे मानधन द्यावे लागते. पोलिस पाटलांसह कोतवालांचा वाढीव मानधनासाठी संघर्ष सुरू असतानाच आता त्यांना नियमित मानधनासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव सादर करूनही अद्याप पोलिस पाटलांना मानधन मिळालेले नाही. पोलिस प्रशासनावरील कामाचा ताण कमी व्हावा, गावातील भांडण, तंटे गावातच मिटावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस पाटलांना मानधनासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडावे लागत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाने मानधनाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयास सादर केला आहे, परंतु निधीअभावी मानधन मिळालेले नाही. मार्चपासून नियमित मानधन मिळेल, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीही व्यक्‍त केला आहे.

मानधन वाढविले पण तरतूदच नाही

तत्कालीन युती सरकारच्या काळात पोलिस पाटलांच्या मानधनवाढीच्या लढ्याला यश मिळाले. दरमहा साडेतीन हजार रुपये मिळणारे मानधन सहा हजार 500 रुपये झाले. मात्र, दोनवेळा वाढीव मानधन मिळाले आणि ऑगस्टपासून मानधनवाढही नाही अन्‌ नियमित मानधनही मिळाले नाही. मानधनवाढ केल्याने सर्व अनुदान ऑगस्टमध्येच संपले. त्यामुळे आता मार्चच्या अर्थसंकल्पात या वाढीव मानधनाची तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर पोलिस पाटलांना नियमित मानधन मिळेल, असे नियोजन आहे.

सौर्स : सकाळ

TET Certificates Validate Updates

TET Certificates Validate Updates

The government has now extended the validity period of the Teacher Eligibility Test Certificate. Currently, the validity of TET eligibility certificate is seven years. It will no longer be a lifetime. Pokhriyal said that this would be a positive step towards increasing employment opportunities for candidates who want to pursue a career in education.

TET Certificate आता आजीवन वैध; 7 वर्षे मुदतीची अट रद्द

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टीईटीबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा सर्टीफिकेटच्या वैधतेचा कालावधी आता वाढवला आहे. सध्या टीईटी पात्रतेच्या सर्टीफिकेटची वैधता सात वर्षे इतकी आहे. यापुढे ती आजीवन असणार आहे. पोखरियाल यांनी सांगितलं की, शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना रोजगारासाठी संधी वाढण्याच्या दिशेनं हे एक सकारात्मक पाऊल असणार आहे.

सरकारी शाळांमध्ये शिक्षक बनण्यासाठी धडपडणाऱ्या उमेदवारांना सरकारच्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. 2011 पासूनच्या टीईटी सर्टिफिकेटची वैधता ही 7 वर्षांऐवजी आजीवन लागू राहणार आहे.

शिक्षण मंत्री म्हणाले की, केंद्र शासित प्रदेश आणि संबंधित राज्य सरकारने ज्यांचे टीईटी सर्टीफिकेटची 7 वर्षांची मुदत संपली आहे त्यांना नवीन सर्टिफिकेट देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करेल. शिक्षकांच्या नियुक्तीला पात्र ठरण्यासाठी निकषांपैकी एक टीईटी आहे.

Maharashtra Police Bharti 2021

Police Bharti 2021 latest updates

खुशखबर! साडेबारा हजार जागांसाठीच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा

Maharashtra Police Bharti 2021 : The Police Recruitment Process in Maharashtra will started soon, the recruitment process will be in progress. State Home Minister Anil Deshmukh told a press conference that 5,300 posts would be recruited in the first phase and 7,500 in the second phase. It was decided to recruit 12,500 personnel in the police force. The Maratha reservation delayed the recruitment process. But after discussions with various organizations, the way is finally open for recruitment. As a result, recruitment process of 5,300 people will be started in the first phase in the next few days. Read the complete details carefully given below:

महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५,३०० तर दुसऱ्या टप्प्यात ७,५०० पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे.


आठ दिवसात पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार

Maharashtra Police Bharti 2021: Home Minister Anil Deshmukh has made a big announcement in the last few days while there has been a lot of discussion about police recruitment in the state. He announced that recruitment process will be implemented for 12538 posts in the police department.

Updated 12.01.2021: राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोर्स: न्यूजटाऊन


Updated 11.01.2021: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत (Police recruitment) उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. (Mega job recruitment 2021 in Police department in Maharashtra)

तसेच 12538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मात्र, आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस भरतीबाबत काय जीआर?

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

Police Bharti 2021 GR Published by Home Ministry – As per the latest updates the state Home Ministry has decided not to have SEBC reservation for conducting police recruitment process in the Maharashtra state. The age limit of open category will be applied while determining the eligibility of candidates who have applied from SEBC. The state government has issued a ruling in this regard. It has been decided that the candidates who fulfill the terms and conditions of the open category should be considered from the open category. Those who apply from SEBC will be charged an open category examination fee. Increased examination fees will be allowed to be paid online. Proceedings must be completed within 15 days. The Director General of Police has been directed to implement this decision immediately and submit a report to the government.

Police Bharti 2021-GR

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. (Maharashtra Home Ministry issued GR for SEBC candidates apply from open quota to police recruitment)

‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले.

दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा संघटनानंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार

मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे. या परीक्षार्थी उमेदवारांची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली कमाल संधी आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भातील परिपत्रके मागे घेणे आवश्यक आहे, यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती, असं रोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

सोर्स: टीव्ही 9 मराठी


Updated 28.12.2020: Maharashtra Police Bharti 2020: Maharashtra State has announced Mega Recruitment in the Police Department Of Maharashtra. He said A total of 12,528 posts in the police force will be filled in 2020. Maharashtra.”A total of 12,000 constables will be recruited in the state police, of which 5,295 posts will be appointed soon in the first phase. This is the largest recruitment in State’s Police Department ..Keep visiting Mahagov.in for the latest Update On Police Bharti.

28 डिसेंबर २०२० : महाविकास आघाडी सरकारच्या वतीने एकूण 12 हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सर्वात मोठी बातमी : राज्यात साडेबारा हजार पदांसाठी पोलिस भरती होणार

महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संख्याबळ पुरेसं नाही. तसंच राज्यात कायदा आणि सुवव्यवस्था राखत असताना उपलब्ध असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पोलिस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे


अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण-प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड

राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स

सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे.

उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असं मंत्री मलिक यांनी सांगितले.

शिकवणार काय?

’ प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.

’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र एखाद्या जिल्ह्य़ात किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांना प्रशिक्षण देणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले.


Maharashtra Police Bharti 2021 Expected Soon

राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती ; गृहमंत्री देशमुखांचे आदेश

Maharashtra Police Recruitment 2020: There is good news for young people who are unemployed and have lost their jobs in the lockdown. Not two-four thousand but 12 thousand 538 posts will be filled in the police force in the state. Home Minister Anil Deshmukh has directed the Home Department to fill the vacancies by December. Therefore, the police recruitment process will begin in the coming days in the state

बरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूश खबर आहे. राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुमारे तासभर ही बैठक चालली.

या बैठकीत कोणती कोणती पदे आणि कोणत्या कोणत्या विभागात रिक्त आहेत, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर कधी पर्यंत पूर्ण होईल, याचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.


In a move that is likely to benefit the youth of Maharashtra, the state government has decided to recruit 10,000 policemen to ease the stress on the police force.

Besides, Maharashtra will also build an all-women Batallion of 1400 personnel in Nagpur’s Katoltaluka, state Home Minister Anil Deshmukh said.

The decision was taken during a meeting presided over by Deputy Chief Minister Ajit Pawar at the Mantralaya, which was attended by Deshmukh and senior officials, an official statement said.

A decision has been taken to recruit 10,000 personnel in the police shipai (constable) category to strengthen law and order in the state and reduce work stress on the force,” Pawar was quoted as saying in the statement.

कोरोनामुळे राज्यातील पोलिस यंत्रणांवरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी पोलिस शिपाई पदासाठीच्या दहा हजार जागांवर भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. नागपूर येथील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी या प्रसंगी दिली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. यानंतर त्यांनी या घोषणा केल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

दरम्यान, बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी उपस्थित होत्या.

आठऐवजी दहा हजार जागा केल्या मंजूर

गृहविभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून देत एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

राज्यात १० हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे.

Maharashtra Police Bharti 2021 Expected Soon

Police Recruitment 2020 : Home Ministry Anil Deshmukh announce that the Mega Police Bharti 2020 will be done soon. Home Department has decided to take up the mega recruitment and the Home Department is trying to fill the vacant posts in the police force. Under this decision, the Home Department will soon recruit police for seven to eight thousand posts in coming months. Candidates keep visit on our govexam.in website and read the complete details carefully given below :

राज्यात ८ हजार पोलीस, ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती होणार

Police Recruitment 2020 : As per the latest news Home Announce the State Police Bharti news for 8000 Posts. and also Security Guard bharti News for 7000 posts in upcoming month. Read the details given below on this page, candidates keep visit us for further updates.

पुणे: राज्यात येत्या काळात ८ हजार पोलीस आणि ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारने राज्यात गेल्या पाच वर्षात पोलीस भरती केली नव्हती. त्यामुळेच ही भरती करण्यात येणार असल्याचं देशमुख म्हणाले.

७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्याची चौकशी करण्यासाठी दो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या भाजपच्या एका बड्या नेत्यानेही त्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सौर्स : मटा


राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

पोलिस शिपाई भरतीला मुहूर्त केव्हा?

Police Recruitment 2020 : Maharashtra Government announces recruitment of 1000 seats for police vehicles Candidates also filled out his application. On November 2019, the recruitment process for 828 seats of the state reserve police force was announced. Candidates also filled out his application. However, the recruitment process for these three forces has not yet been finalized. Read the complete details carefully and keep visit us.

Police Recruitment 2021

राज्यातील साडेतीन हजार पोलिस शिपाई भरतीसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरून घेतल्यानंतर आतापर्यंत गृह विभागाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरमध्ये पोलिस वाहनचालक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शिपाई भरतीचेही अर्ज भरून घेतले. मात्र, पुढे काहीच हालचाल नसल्याने उमेदवार निराश झाले आहेत. मागील वर्षीचीच साडेपाच हजारांची भरती होत नसताना गृहमंत्री नव्याने आठ हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगत असल्याने ही निराशा वाढली आहे.

गृह विभागाने सप्टेंबर २०१९ मध्ये राज्यात तीन हजार ५०० पोलिस शिपाई पदांची भरती जाहीर केली. त्याचे अर्ज उमेदवारांनी भरले. आतापर्यंतच्या सात वर्षांतील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी किंवा लेखी परीक्षेच्या प्रक्रियेला सुरुवात केली जात होती. मात्र, २०१९ मध्ये ही प्रक्रिया रखडली. ती अजूनही सुरू झालेली नाही. सरकारने पोलिस वाहनचालकांच्या एक हजार जागांची भरती जाहीर केली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या ८२८ जागांची भरतीप्रक्रिया जाहीर झाली. त्याचेही अर्ज उमेदवारांनी भरले. मात्र, या तिन्ही दलांच्या भरती प्रक्रियेला अद्याप मूहूर्त मिळालेला नाही.

या संदर्भात सरकारनेही कोणतेही परिपत्रक काढले नसल्याने राज्यभरातून शहरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या अॅकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेणारे उमेदवार संभ्रमात आहेत. त्यांचा प्रतिमहिना चार हजार रुपयांचा खर्च वाढत चालला आहे. ही परीक्षा महापोर्टलद्वारे होणार, की यापूर्वीच्या प्रक्रियेतून होणार; तसेच ऑनलाइन की ऑफलाइन, याचीही माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे संगणकावर सराव करावा, की कागद-पेन पद्धती अवलंबावी, या विषयीही उमेदवार संभ्रमात आहेत. पोलिस भरती होताना अगोदर लेखी चाचणी होणार, की मैदानी चाचणी याविषयीही उमेदवारांत गोंधळाचे वातावरण आहे.

मी पोलिस शिपाई होण्यासाठी सोलापूरातून बारामतीत आले आहे. गेले चार महिने मी फक्त अभ्यासच करत आहे. यातून माझा प्रशिक्षण व निवास, भोजनाचा खर्च वाढत चालला आहे. आतापर्यंत महिन्यात प्रक्रिया सुरू व्हायची आणि भरतीही पूर्ण होत होती. आता मात्र ती लांबली असल्याने माझ्यापुढे समस्या वाढत चालल्या आहेत.

गृह विभागाने या संदर्भात परिपत्रक काढणे अत्यंत जरुरीचे आहे. राज्यात वेगवेगळ्या शहरांत गावांकडून आलेले उमेदवार थांबून आहेत. त्यांचा खर्च दिवसेदिवस वाढत चालला आहे. ही मुले अल्प उत्पन्नगटातील असतात. त्याचा विचार सरकारने करावा. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यानुसार व पद्धतीने होणार, याचाही खुलासा करावा. ही सर्व पदे पाच हजार २९७ आहेत. त्यासाठी लाखो उमेदवार प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हा गोंधळ थांबला पाहिजे.

म. टा.


Police Recruitment 2021

Update : १ फेब्रुवारी २०२० – शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्राधान्याचा विषय असल्यामुळे जिल्हास्तरावरील योजनांसाठी गेल्या वर्षीची नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद  या वर्षी नऊ हजार ५०० कोटींपर्यंत वाढविली जाईल. मार्चपर्यंत कर्जमाफी पूर्ण होईल, असे वाटत होते. मात्र, त्याला वेळ लागेल असे सांगत राज्यात येत्या काळात आठ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर ‘सारथी’तील अनियमिततांची दखल घेऊन पारदर्शक व्यवहार व्हावा म्हणून तेथे ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचाही विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथे सांगितले.

अमरावती: देशभरात बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र रुप धारण केलेले असताना, रोजगाराबाबत राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्यागृहविभागाने मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला असून पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या प्रयत्नात गृहविभाग आहे. या निर्णयांतर्गत गृह विभाग लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती करणार आहे. ही माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.

दिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांनी आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.

सौर्स : मटा

Police Recruitment 2021

महाराष्ट्र पोलीस भरती 2021

Maharashtra Police Recruitment 2020: The Order of High Court to the State Government to fill the vacant seats of Maharashtra police Bharti 2020. There are 8757 vacancies and more vacancies are kept vacant by Govt. More details & updates about this bharti process are given below. Read the Given article carefully & For More updates about Maharashtra Police Bharti 2019 For updates regarding police bharti keep visiting GovExam.in

Current Status Of State police staff

  • Total No. of Approved Posts : 2 lakh 19 thousand 268 Posts
  • Currently Filled Posts (Currently Working) : 2 lakh 7 thousand 725 Posts
  • Total Vacant Posts : 11 thousand 543 Posts

The Police Bharti 2019 Second Phase will begin soon for large number of remaining vacancies. The Online Application forms are expected to available a December 2019.

Police Bharti 2021-3450 Police Constable posts

As per the Latest update Received, police Bharti Online Application Forms is available now. There were total 3450 vacancies for Police Constable posts in Maharashtra. Online Registration link open on 3rd September 2019 Evening. Police bharti 2019 online form date is now 3rd September 2019. Last date to apply online through the Maharpariksha.gov.in. Portal. The PDF Advertisements of All Districts Are given. You can Click on given Link & Download official PDF Advertisement. www.GovExam.in.

In all over Maharashtra state there are 2 lakh 19 thousand 268 police officer posts are approved. These vacant posts are from Police Constable to Director General of Police office post. At current state there total 2 lakh 7 thousand 725 posts are filled & still 11 thousand 543 posts are still vacant. Now after the order from Mumbai High Court, it is expected that soon Maharashtra Police Department will start the recruitment process for filling up these vacancies.

Related Links: