Security Guard MahaBharti in March

Security Guard MahaBharti in March

येत्या मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार : अनिल देशमुख

Security Guard Recruitment 2020 : As per the news Home Ministry Anil Deshmukh Announce that the Maha bharti for Security Guard in Maharashtra. There are total 7000 vacancies will be recruitment in March 2020 fro Security guard. Candidates keep visit on this page we update the all information regarding this recruitment in this page. Read the complete details carefully and keep practicing.

राज्यात लवकरच सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती

Security Guard Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीने मार्चमध्ये ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, द्रुतगती महामार्ग, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, मध्य व पश्चिम रेल्वे अशा विविध संवेदनशील आस्थापनांना सशस्त्र संरक्षण पुरविले जाते.आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहे. येत्या मार्चपासून ७ हजार जणांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. भरतीची ही ठिकाणे मुंबई व नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना असणार आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे :

  1. आतापर्यंत राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ९ हजार ७४९ सुरक्षा रक्षक विविध ठिकाणी कार्यरत
  2. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना २ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत
  3. पुणे पोलिसांवरील कारवाईबाबत विधी सल्ल्यानंतर निर्णय

एल्गारचा तपास जरी एनआयएकडे गेला असला तरी या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाविषयी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करुन चौकशी करता येईल का असा प्रस्ताव गृृह मंत्रालयाकडून राज्याच्या विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ देशमुख म्हणाले, एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे जाऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. तो राज्य अभियोक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यानी आपला अधिकार वापरला

एल्गारचा तपासाची चौकशी करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर दुसºया दिवशी केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला. आमचे म्हणणे होते की, केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घेतले पाहिजे होते. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यात येऊ नये, असा आपला प्रस्ताव होता. मात्र, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांचा प्रस्ताव अमान्य करण्याचा अधिकार आहे़ त्यांनी तो वापरला आहे.

सौर्स : लोकमत

Pune Metro Recruitment 2020

Pune Metro Recruitment 2020

पुणे मेट्रोसाठी दोनशे पदे भरणार

Pune Metro Bharti 2020 : As per the latest news the Pune Metro Project will be recruiting the 200 vacancies for various posts. Various vacancies will be recruiting for the Positions for the operation of the metro, maintenance and maintenance posts etc., 85 posts will be filled for the operation of the metro and 110 for maintenance. The main emphasis is currently on completing the work of the station along the subway line in Pimpri. The work of Sant Tukaramnagar Metro station has been completed at 70 percent and the work of Fugewadi station has reached sixty percent. Since there are two trains currently on the same route, ‘Mahametro’ is trying hard to complete both these stations. Read the more details below on this page. Keep visit on our website for the further updates.

Pune Metro Bharti 2020  मेट्रोच्या संचलनासाठीची पदे, देखभाल-दुरुस्तीसाठीची पदे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी आणि पुण्यातील प्राधान्य मार्गाच्या संचलन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी (ऑपरेशन अँड मेन्टेनन्स) १९५ पदे भरण्याचा निर्णय महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. मेट्रो स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर यांपासून ते रूळ, सिग्नल आणि इतर यंत्रणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या दृष्टीने मेट्रो कार्यान्वित होण्यापूर्वी ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना मेट्रोतून सफर करण्यासह प्रत्यक्ष मेट्रोमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि पुण्यातील आनंदनगर ते गरवारे कॉलेज अशा शहरातील सुमारे १० किमीच्या मार्गावर पुढील काही महिन्यांत मेट्रो सेवा सुरू करण्याचे संकेत ‘महामेट्रो’ने दिले आहेत. ही सेवा सुरू करण्यापूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पासाठी विविध स्वरूपातील पदे भरणे गरजेचे असून, ‘महामेट्रो’च्या संचालक मंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. मेट्रोच्या संचलनासाठी ८५, तर देखभाल-दुरुस्तीसाठी ११० पदे भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संचालक मंडळाने व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन स्टेशन कार्यान्वित केली जाणार आहेत. त्यामुळे मेट्रो संचलनाच्या वेळेत स्टेशनवरील विविध कामांसाठी पदभरती केली जाणार आहे. यामध्ये स्टेशन कंट्रोलर, स्टेशन मॅनेजर, ड्रायव्हर इन्स्ट्रक्टर, मनुष्यबळ, वित्त आणि भांडार यांसह ऑपरेशन अँड कमांड सेंटरसाठी (ओसीसी) पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याशिवाय, प्रत्यक्ष मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी १३ ट्रेन ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. मेट्रोचे संचलन सुरू झाल्यानंतर रूळ, सिग्नल, कम्युनिकेशन, विद्युतप्रवाह अशा विभागांतर्गत देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने, देखभाल-दुरुस्तीकरिता ११० पदे भरण्यात येणार आहेत.

महिलांसाठी संधी

नागपूर मेट्रो कार्यान्वित झाली, त्या वेळी पहिल्यांदा ट्रेन चालविण्याची संधी महिलाचालक सुमेधा मेश्राम यांना मिळाली होती. नागपूर मेट्रोमध्ये इतरही विविध पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली असून, पुण्याच्या मेट्रोसाठी सुरुवातीला मंजूर झालेल्या पदांमध्येही महिलांना संधी मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

स्टेशनच्या कामांवर भर

पिंपरीमध्ये मेट्रो मार्गिकेसह स्टेशनची कामे पूर्ण करण्याकडे सध्या सर्वाधिक भर देण्यात आला आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, फुगेवाडी स्टेशनचे काम साठ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच मार्गावर सध्या दोन ट्रेन दाखल झाल्या असल्याने ही दोन्ही स्टेशन पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’कडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

Civil Engineer Jobs 2020

Civil Engineer Jobs 2020

डिप्लोमा ‘तुपाशी’, डिग्री ‘उपाशी’

In Maharashtra State from last 20 year JE Examine was conducted for the Civil Engineer Recruitment. According to this recruitment process, only students who have been awarded diploma in civil engineering are getting the opportunity to graduate, while students who are highly educated like civil engineering degree are being dismissed. Read other important details which is given below:

BE Jobs 2020

राज्य सरकार २० वर्षांपूर्वीच्या सेवाप्रवेश नियमांच्या आधारे पदभरतीची प्रक्रिया राबवित असल्याने, राज्यातील सुमारे १ लाख बेरोजगार पदवीधर स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनीअर) भरती प्रक्रियेच्या अर्हतेत बसत नसल्याचे समोर आले आहे. या भरती प्रक्रियेच्या नियमानुसार सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांनाच पदभरतीची संधी मिळत असून, सिव्हिल इंजिनीअरिंग पदवीसारखे उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग अशा सरकारी विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठी भरती प्रक्रिया राज्य सरकारच्या १९९८ सालच्या सेवाप्रवेश अधिसूचनेतील नियमांनुसार होते. या विभागांमध्ये जेई पदाच्या निवडप्रक्रियेत सिव्हिल शाखेत डिप्लोमा किंवा डिप्लोमा करून पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. मात्र, बारावीनंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येते. निवड प्रक्रियेतील या जाचक अटींमुळे य़ा पदवीधर विद्यार्थ्यांना पदभरतीसाठी अर्जच करता येत नसल्याचे चित्र आहे. या निवड प्रक्रियेत बारावीनंतर सिव्हिल शाखेत इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना संधी द्यावी, अशा मागणी गेल्या राज्य सरकारकडे करण्यात आली होती. तत्कालीन सरकारच्या प्रतिनिधींनी सेवाप्रवेश नियमावलीत बदल करून पदवीधरांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही, असा आरोप इंजिनीअर्स असोसिएशनने केला आहे. या सेवाप्रवेश नियमात तातडीने बदल करून, बारावीनंतर सिव्हिल शाखेत इंजिनीअरिंग पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना संधी देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. यासोबतच जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

नव्या सरकारकडून अपेक्षा

राज्य सरकारने १ जानेवारी १९९८ रोजीच्या सेवाप्रवेशाच्या नियमावलीमधील शैक्षणिक अर्हतेत बदल करून, इयत्ता बारावीनंतर स्थापत्य शाखेत इंजिनीअरिंग पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी द्यावी, अशी प्रमुख मागणी असोसिएशनने केली आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने, नव्या सरकारने तातडीने निर्णय़ घेऊन हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, असेही असोसिएशनच्या वतीने स्वप्नील खेडकर यांनी सांगितले.

सौर्स : मटा

Job opportunities for these positions at UPSC Apply here

Job opportunities for these positions at UPSC Apply here

UPSC मध्ये या पदांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज

UPSC Recruitment 2020 : UPSC published an advertisement for the recruitment of various 134 posts. Online Applications are invited from the eligible candidates. we provide the complete details of how to apply for candidates in this posts. Online Apply last date is 13th February 2020. Read the details carefully and apply as soon as possible.

असा करा अर्ज… How to apply Given below:

7th pay commission:

मुंबई : संघ लोक सेवा आयोगने (Union Public Service Commission – UPSC) असिस्टंट इंजिनियर (UPSC Assistant Engineer Recruitment 2020), मेडिकल ऑफिसर (आयु्र्वेद), एंथ्रॉपोलोजिस्ट आणि इतर काही पदांसाठी सरकारी नोकरीत भरती सुरु करण्यात आली आहे. यात सातव्या वेतन आगोयाच्या शिफारसीनुसार, पगार आणि इतर सुविधा मिळणार आहेत. या नोकरीसाठी आवश्यक ती योग्यता आणि आवड असल्यास या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.

या भरतीसाठी – Eligibility for this recruitment

पद – असिस्टंट इंजिनियर, मेडिकल ऑफिसर (आयु्र्वेद), एंथ्रॉपोलोजिस्ट आणि इतर रिक्त पदांची संख्या – १३४

योग्यता – ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीबीएस

पगार – लेव्हल ७, १०, १२

वयोमर्यादा – जास्तीत ४५ वर्ष

परिक्षा फी –

ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गातील लोकांना ऑनलाईन अर्ज करताना २५ रुपये भरावे लागणार आहेत. फी पेमेंट करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, एसबीआयच्या कोणत्याही शाखेत चालानद्वारे करता येऊ शकतं. याशिवाय एससी, एसटी, पीएच आणि कोणत्याही महिला उमेदवाराला परिक्षा फी भरावी लागणार नाही.

Important Dates :

ऑनलाईन अर्ज करण्याची तारिख – २५ जानेवारी २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख – १३ फेब्रुवारी २०२०

येथे करा ऑनलाईन अर्ज Online Apply here

उमेदवाराची निवड मुलाखतीच्याआधारे करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन www.upsconline.nic.in अधिक माहिती घेता येऊ शकते.

Complete advertisement :

📄 जाहिरात

Fraud in Talathi Recruitment 2020

Fraud in Talathi Recruitment 2020

Talathi Recruitment 2020 : Ahmednagar Talathi Bharti Fraud case Was revealed. The recruitment process was implemented for 9 posts of Talathi and 4 posts of driver for reserved tribes in the Ahmednagar district. In these years, a written examination was held on January 13 at the center of New Arts and New Law College in the Ahmednagar city. 442 candidates had appeared for the posts of Talathi and 36 for the driving post. Subsequently, after scrutinizing the written test paper, a list of the candidates’ qualifying marks was put on the website of the Collector office. Subsequently, during the written examination, the officer was inspecting the signatures of the candidates on the paper and online applications, while there was a discrepancy between some of the signatures which led to the suspicion of the dummy candidate. After examining the video shooting in the exam center, it became clear that the applicants who applied for the exam and the exam centers were different.

सह्यांमुळे भरतीतील गैरप्रकार उघड

तलाठी होण्यासाठी डमी उमेदवार बसविणाऱ्या तीन जणांना पकडून तोफखाना पोलिस स्टेशनला…

तलाठी व वाहनचालक भरतीत डमी उमेदवार दिल्याचा प्रकार मूळ उमेदवार व डमी उमेदवारांच्या सह्यांतील तफावतीतून उघडकीस आला. त्यानंतर परिक्षा केंद्रामधील व्हिडिओ शुटिंग व उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आल्यानंतर भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा निष्कर्ष जिल्हा निवड समितीने काढून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिला. त्यानुसार दहा जणांविरुद्ध गुरुवारी रात्री तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या तलाठीपदाच्या नऊ व वाहनचालकाच्या चार पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. या वर्षांत १२ जानेवारी रोजी नगरच्या न्यू आर्ट्स व न्यू लॉ कॉलेजच्या केंद्रावर लेखी परिक्षा झाली. तलाठी पदासाठी ४४२ आणि वाहनचालक पदासाठी ३६ उमेदवारांनी परिक्षा दिली होती. त्यानंतर लेखी परिक्षेचे पेपर तपासल्यानंतर उमेदवारनिहाय मिळालेली गुणांची प्रारुप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली होती. त्यानंतर लेखी परिक्षांच्या वेळी पेपरवरील सह्या व ऑनलाइन अर्जांवरील उमेदवारांच्या सह्यांची तपासणी अधिकारी करीत असताना काही सह्यांमध्ये तफावत आढळून आल्याने डमी उमेदवाराने परिक्षा दिल्याचा संशय निर्माण झाला. परिक्षा केंद्रातील व्हिडिओ शुटिंग तपासल्यानंतर अर्ज करणारे व परिक्षा केंद्रात परिक्षा देत असलेले उमेदवार वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी प्रारुप यादीमधील १३ उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यात दहा जण हजर होते. त्या सर्वांना परिक्षा कुठे दिली, बैठक क्रमांक किती होता, अशी प्राथमिक माहिती विचारल्यानंतर विशाल इंगळे, अंजली म्हस्के, मंगेश दांडके यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे जिल्हा निवड समितीला गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. पकडलेल्या तिघांना तोफखाना पोलिस स्टेशनच्या ताब्यात देऊन त्यांच्यासह इतर सात असे दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डमी बसवून आला अव्वल

या परिक्षेत डमी उमेदवार बसवून विशाल इंगळे हा दोनशे गुणांपैकी सर्वाधिक १८२ गुण मिळाल्याने यादीत पहिला आला होता. तर अंजली म्हस्के हिला मुलींमध्ये १६६ गुण आहेत. मंगेश दांडगे याला १६०, तर पंढरीनाथ साबळे याला १६० गुण होते. हे चौघेही तलाठी म्हणून भरती होणार होते. तर, रवी पवार याला शंभर गुण मिळाले असून, तो वाहनचालक म्हणून भरती होणार होता.

मोठे रॅकेट असल्याचा संशय

अटक करण्यात आलेले तिघे मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यातील आहेत. त्या ठिकाणावरून हे रॅकेट चालविण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे. अटकेत असलेल्या तीन उमेदवारांकडे याबाबत चौकशी करण्यात येत आहे. अटक असलेल्या तरुणीने भरतीसाठी एकाला तब्बल बारा लाख रुपयांची रक्कम दिल्याचे तरुणी सांगत आहे.

म. टा.